
नवी दिल्ली l New Delhi :
संरक्षण मंत्री राजनाथ सिंह (Defense Minister Rajnath Singh) यांनी आज (दि. 14) पत्रकार परिषद घेत मोठी घोषणा केली. सैन्यदलात चार वर्ष काम करुन तरुणांना देशसेवेची संधी दिली जाणार आहे. यासाठी 50 हजार अग्निवीरांची नियुक्ती केली जाणार आहे. तरुणांसाठी सैन्यभरतीची (Indian Army) ही सुवर्णसंधी असल्याचं मानले जात आहे.
https://twitter.com/ANI/status/1536627788442001408
‘अग्निपथ’ योजनेअंतर्गत (Agneepath Scheme) देशातील हजारो तरुणांना सशस्त्र दलात (Indian Armed Forces) काम करायला मिळणार आहे. तरुणांना यासाठी विशेष प्रशिक्षणासह त्यांना या योजनेच्या माध्यमातून आर्थिक मोबदला देखील दिला जाणार आहे. चार वर्ष सेवेनंतर अनेक सुविधांचा लाभ तरुणांना दिला जाईल, अशी घोषणा राजनाथ सिंह यांनी यावेळी केली. ते दिल्लीत आयोजित करण्यात आलेल्या एका पत्रकार परिषदेत बोलत होते. यावेळी त्यांच्यासोबत तिन्ही सैन्य दलाचे प्रमुखही उपस्थित होते.
Delhi | The Cabinet Committee on Security has taken a historic decision today to approve the transformative scheme of 'Agnipath'. Under this, Indian youth would be granted an opportunity to get inducted into the Armed services: Defence Minister Rajnath Singh pic.twitter.com/eUv2SyQBPw
— ANI (@ANI) June 14, 2022
राजनाथ सिंह यांच्या घोषणेतील ठळक मुद्दे (Highlights of Rajnath Singh’s Declaration) :
-
सैन्यात बदल करुन अत्याधुनिक बनवणार (Making changes in the army and making it sophisticated)
-
तरुणांना सैन्याचं प्रशिक्षण देण्याची योजना (Plan to train the youth in the army)
-
तरुणांना सैन्याची सेवा करण्याची संधी (Opportunity for young people to serve in the military)
-
सैन्याची वर्दी घालण्याची संधी मिळणार (There will be an opportunity to wear army uniforms)
-
सैन्याकडून चांगला पगार मिळणार (You will get a good salary from the army)
मोदी हैं तो…! देशात 1.5 वर्षात 10 लाख नोकऱ्या देणार केंद्र सरकार
4 वर्षांच्या सेवेनंतर अनेक सुविधा मिळणार (Many facilities will be available after 4 years of service)
भारतीय सैन्यदलात सैनिकांची कमतरता असल्यामुळे हा निर्णय घेतला जाण्याची शक्यता वर्तवली जात होती. त्यानुसार अखेर ही घोषणा करण्यात आली आहे. भारतील सैन्यात दीड लाख सैनिकांची कमतरता असून दर महिन्याला त्यात आणखी पाच हजारांची भर पडते आहे. दर महिन्याला सुमारे पाच हजार सैनिक निवृत्त होत असून त्यांच्या जागी भरती करण्याची गरज व्यक्त होत होती. ही भरती तातडीनं करण्याची गरज आहे. सध्याच्या घडीला भारतीय सैन्यात 1.2 दशलक्ष सैनिक असल्याची अधिकृत आकडेवारी देण्यात आली आहे. कोरोना महामारी सुरु होण्याआधी दरवर्षी भरती केली जात असे. 2019-20 मध्ये 80,572 सैनिकांची तर 2018-19 मध्ये 53,431 सैनिकांची भरती करण्यात आली होती.
पाहा नेमकं काय म्हणाले संरक्षण मंत्री राजनाथ सिंह?
Addressing the Media Conference on ‘Agnipath Scheme’. Watch https://t.co/ZZ0P33RbHe
— Rajnath Singh (मोदी का परिवार) (@rajnathsingh) June 14, 2022
सीडीएस बिपीन रावत यांच्या कल्पना अखेर सत्यात उतरली!
हेलिकॉप्टर दुर्घटनेमध्ये मृत्यू झालेल्या दिवंगत बिपिन रावत यांनी अग्निपथ योजनेची संकल्पना मांडली होती. तत्कालीन चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ जनरल बिपिन रावत (Chief of Defense Staff General Bipin Rawat) मृत्यूनंतर ही संकल्पना आता सत्यात उतरल्याचं पाहायला मिळतंय. या योजनेची ब्लू प्रिंट तत्कालीन 2020 मध्ये तयार साकारण्यात आलेली. सैनिकांची कमतरता भासू नये, तसंच सैन्याच्या पेन्शनवरील खर्च कमी करावा आणि तरुणांना सैन्यात भरती होण्यास प्रोत्साहिक करावं, हा या संकल्पनेमागचं प्रमुख हेतू होता. दरम्यान आता संरक्षणं मंत्र्यांनी घोषणा केल्यानं देशातील तरुण या योजनेला कसा प्रतिसाद देतात, हे पाहणं महत्त्वाच आहे.
विधान परिषद निवडणूकही रंगणार; 10 जागांसाठी 11 उमेदवार, बिनविरोधाचे प्रयत्न फसले