
अखेर राज ठाकरेंवर ‘या’ कलमान्वये गुन्हा दाखल; गृहमंत्र्यांच्या बैठकीनंतर अटक होणार?
मुंबई l Mumbai :
दि. 03 तारखेला ईद (Eid) आहे. मला त्यांच्या सणात यायचे नाही. पण, दि. 04 तारखेपासून ऐकणार नाही”, असा अल्टिमेटम मनसे प्रमुख राज ठाकरे (MNS President Raj Thackeray) यांनी सरकारला दिला. असं असलं तर दि. 03 तारखेला मनसेकडून महाराष्ट्रात महाआरतीच्या (MNS Maha Aarti) कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
मात्र, तो कार्यक्रम रद्द करण्यात आला आहे. मुस्लीम धर्माच्या सणामध्ये व्यत्यय नको म्हणून राज ठाकरेंनी हा निर्णय घेत आहे, अशी माहिती मनसेचे प्रवक्ते योगेश खैरे (MNS Spokesperson Yogesh Khaire) यांनी दिली.
https://twitter.com/RajThackeray/status/1521062255722659841?ref_src=twsrc%5Etfw%7Ctwcamp%5Etweetembed%7Ctwterm%5E1521062255722659841%7Ctwgr%5E%7Ctwcon%5Es1_&ref_url=https%3A%2F%2Fpudhari.news%2Flatest%2F174702%2Fmns-cancels-maha-aarti-tomorrow%2Far
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून (Maharashtra Navnirman Sena) उद्या (दि. 03 मे) पुण्यात होणारा महाआरतीचा कार्यक्रम स्थगित करण्यात आला आहे. मनसे, विश्व हिंदू परिषद (Vishwa Hindu Parishad) आणि बजरंग दल (Bajrang Dal) यांनी एकत्र येऊन उद्या पुण्यातील सर्व प्रमुख मंदिरांमध्ये भोंगे लावून आरती करण्यात येईल, असे शनिवारी (दि. 30 एप्रिल) जाहीर केले होते.
त्यासाठी मनसेच्या सर्व विभागप्रमुखांना त्यांच्या त्यांच्या भागांमध्ये महाआरतीचे आयोजन करण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या. मात्र आता मनसेकडून महाआरतीचा कार्यक्रम स्थगित केल्याचे जाहीर करण्यात आले आहे.
https://twitter.com/ZagdyaRamoshi/status/1521068279187472385
औरंगाबादच्या सभेत काय म्हणाले होते राज ठाकरे?
4 तारखेपासून ऐकणार नाही, शरद पवार, भोंगे अन् बरंच काही… वाचा राज ठाकरेंच्या भाषणातील ठळक मुद्दे