शेतकऱ्याच्या जनधन खात्यात जमा झाले चक्क १५ लाख, मोदींचे आभार मानत बांधलं स्वप्नातलं घर आणि मग…

शेतकऱ्याच्या जनधन खात्यात जमा झाले चक्क १५ लाख, मोदींचे आभार मानत बांधलं स्वप्नातलं घर आणि मग... l farmer received 15 lakh in Jandhan bank account truth came after 4 months Aurangabad
शेतकऱ्याच्या जनधन खात्यात जमा झाले चक्क १५ लाख, मोदींचे आभार मानत बांधलं स्वप्नातलं घर आणि मग... l farmer received 15 lakh in Jandhan bank account truth came after 4 months Aurangabad
Share on Social Sites

औरंगाबाद l Aurangabad :

२०१४च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minister Narendra Modi) यांनी काळापैसा भारतात आणणार तसेच सर्वांच्या खात्यात १५ लाख रुपये (15 Lakh rupees) जमा होणार असल्याचे म्हटले होते. मात्र, हे पैसे नागरिकांना मिळालेच नसल्याने यावरुन विरोधकांकडून भाजपवर (BJP) टीकाही करण्यात येते.

पण औरंगाबादमधील (Aurangabad) शेतकऱ्याच्या खात्यात खरोखर १५ लाख रुपये जमा झाल्याचा प्रकार समोर आला आहे. आश्चर्य वाटतंय ना? पण औरंगाबादमधील एका शेतकऱ्याच्या जनधन खात्यात १५ लाख रुपये खरोखर जमा झाले आहेत. (15 Lakh rupees deposited in Jan Dhan Bank Account of Aurangabad Farmer)

Video : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून काँग्रेसची यथेच्छ धु-धु धुलाई

१५ लाख खात्यात आल्याने ‘त्याने’ बांधले आपल्या स्वप्नातले घर

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जनधन खात्यावर १५ लाख जमा करण्याची घोषणा केली होती. त्यानंतर औरंगाबाद जिल्ह्यातील पैठण तालुक्यात (Paithan Taluka) एका शेतकऱ्याच्या जनधन खात्यावर खरच १५ लाख रुपये जमा झाले. खुशीत असलेल्या शेतकऱ्याने जमा झालेल्या १५ लाखातून काही रक्कम काढून स्वतःसाठी घर सुद्धा बांधून घेतले आहे.

ई-मेल द्वारे नरेंद्र मोदींचे मानले आभार

संबंधित शेतकऱ्याने पंतप्रधान कार्यालयाला पैसे मिळाल्याने अभाराचा मेल सुद्धा पाठवला. मात्र काही दिवसांनी एक वेगळाच गोंधळ समोर आला आणि बँक प्रशासन (Bank Administration) आणि जिल्हा परिषद (Zilla Parishad) प्रशासन या शेतकऱ्यांसमोर हात जोडून विनंती करीत आहे. पैसे चुकून जनधन खात्यावर जमा झालेत ते परत करा.

मुक्त विद्यापीठाच्या आजपासून ऑनलाईन परीक्षा; ‘असे’ असेल स्वरुप

नेमकं काय आहे संपूर्ण प्रकरण ?

पैठण तालुक्यातील दावरवाडी (Davarvadi) येथील शेतकरी ज्ञानेश्वर औटे. यांच्या जनधन खात्यावर काही महिन्या आधी १५ लाख जमा झाले. ज्ञानेश्वर यांनी काही महिने वाट पाहिली तरी खात्यातून पैसे वळते झाले नाही किंवा कुणी तशी विचारणा सुद्धा केली नाही, म्हणून त्यांनी खात्यातून पैसे काढून जवळपास ९ लाखच्या वर पैसे काढून घर बांधले.

बँक ऑफ बडोदाच्या (Bank of Baroda) कर्मचाऱ्यांना नंतर लक्षात आले ग्रामपंचायत पिंपळवाडी ग्राम पंचायतीच्या (Pimpalwadi Gram Panchayat) खात्यात हे पैसे जमा करायचे होते तेच पैसे चुकून ज्ञानेश्वर यांच्या खात्यात जमा झाले. त्यानंतर त्यांनी ज्ञानेश्वर यांच्या खात्यात उरलेली रक्कम बँकेने वळती करून घेतली. आता बँक ज्ञानेश्वर यांच्याकडे पैसे बँकेला परत करण्याची विनंती करीत आहे.

७/१२ बंद!; ‘या’ शहरांपासून अंमलबजावणीला सुरुवात

See also  अनिल परब ED च्या जाळ्यात; 'या' 7 ठिकाणी छापेमारी

आपण ह्या बातम्या वाचल्यात का?

See also  SMBT कॉलेज बसला भीषण अपघात; २२ हुन अधिक विद्यार्थी जखमी

Share on Social Sites