नवी दिल्ली । New Delhi :
पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minister Narendra Modi) यांनी आज (दि. ०८) राज्यसभेत (Rajya Sabha) केलेल्या भाषणात काँग्रेसवर तुफान हल्लाबोल केला आहे. काँग्रेस (Congress) नसती तर आणीबाणीचा कलंक लागला नसता. काँग्रेस नसती तर घराणेशाहीला आळा बसला असता.
काँग्रेसमुळे देशाचे मोठे नुकसान झाले आहे. काँग्रेस नसती तर जातीयवाद संपला असता. काँग्रेस नसती तर शिखांचा नरसंहार झाला नसता, अशी जहरी टीका नरेंद्र मोदी यांनी काँग्रेसवर केली आहे.
शेतकऱ्याच्या जनधन खात्यात जमा झाले चक्क १५ लाख, मोदींचे आभार मानत बांधलं स्वप्नातलं घर आणि मग…
राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर पंतप्रधान मोदी राज्यसभेत बोलत होते. नरेंद्र मोदी यांनी यावेळी काँग्रेसवर कडाडून टीका केली. काँग्रेसला फक्त उपदेश देण्याची सवय आहे, असा आरोप करत नरेंद्र मोदी म्हणाले, देशात काँग्रेस नसती तर भ्रष्टाचार झाला नसता, सरकार अस्थिर करणे हेच काँग्रेसचे काम आहे.
राष्ट्रीय या शब्दावर काँग्रेसला आक्षेप आहे तर काँग्रेसने पक्षाचे नाव बदलून आपल्या पूर्वजांची चूक काँग्रेसने सुधारली पाहिजे, असा टोला नरेंद्र मोदी यांनी यावेळी काँग्रेसला लगावला.
[embedyt] https://www.youtube.com/watch?v=0uP5JGEBCl8[/embedyt]
