धुळे l Dhule :
मुंबई-आग्रा महामार्गावर धुळे जिल्ह्यात भीषण अपघात (Major accident on Mumbai Agra Highway in Dhule) झाला आहे. तीन गाड्या एकमेकांना धडकल्याने झालेल्या अपघातात दोन गाड्यांचा अक्षरश: चक्काचूर झाला आहे. हा अपघात इतका भीषण होता की, तिघांचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाला (3 Killed on the spot in accident) आहे तर 9 जण जखमी झाले आहेत. धुळे जिल्ह्यात मुंबई-आग्रा महामार्गावर मित्रनगर (Mitra Nagar Dhule district) जवळ हा भीषण अपघात झाला आहे.
दुधाच्या ट्रकचा आणि टेम्पोचा भीषण अपघात, 5 जणांचा जागीच मृत्यू : खान्देशातील दुर्दैवी घटना
धुळे जिल्ह्यात रात्रीच्या सुमारास हा अपघात झाला आहे. ट्रक, ॲपे रिक्षा आणि क्रूझर गाड्या एकमेकांना धडकून विचित्र अपघात झाला आहे. घटनेची माहिती मिळताच पोलीस आणि स्थानिक नागरिकांनी घटनास्थळी मदतीसाठी धाव घेतली.
यमुना एक्सप्रेसवेवर भीषण अपघात; महाराष्ट्रातील पाचजण जागीच ठार, 2 गंभीर
तिन्ही गाड्यांमध्ये झालेल्या भीषण अपघातानंतर चक्क क्रेनच्या सहाय्याने या गाड्या वेगळ्या करण्यात आल्या. धुळे तालुका पोलीसांनी रात्री मदतकार्य करत जखमींना तात्काळ रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. अपघातातील जखमींवर हिरे वैद्यकीय महाविद्यालयात (Hiray Medical College) उपचार सुरू आहेत. अपघातामुळे महामार्गावर वाहतूक कोंडी झाली होती. अपघात झालेल्या गाड्या महामार्गावरुन हटवण्यात आल्या आणि त्यानंतर महामार्ग वाहतुकीसाठी खुला करण्यात आला.
आपण ह्या बातम्या वाचल्यात का?
राज्याचा 12वीचा निकाल 94.22 टक्के; कोकण विभाग अव्वल, पाहा कोणत्या विभागाचा किती ...
Today’s Horoscope : 'असा' असेल तुमचा आजचा दिवस; जाणून घ्या पंचांग अन् राशी मंथन,...
Video : दिल्लीत पुन्हा निर्भया, २० वर्षीय तरुणीवर सामूहिक बलात्कार, केस कापून का...
Municipal Corporation Elections 2022 : मनपा आरक्षण सोडत जाहीर, अशी आहे तुमच्या म...