Shivjayanti 2022 : शिवजयंती बाबत राज्य सरकारची नियमावली जाहीर; असे असतील नियम

शिवजयंती बाबत राज्य सरकारची नियमावली जाहीर; असे असतील नियम l CM Udhhav Thackeray instructuons issued regarding Shivjayanti 2022
Share on Social Sites

मुंबई l Mumbai :

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती (Chhatrapati Shivaji Maharaj Jayanti 2022) निमित्ताने आयोजित करण्यात येणाऱ्या शिवज्योत दौडीत दोनशे जण आणि जन्मोत्सव सोहळ्याकरिता पाचशे जणांना उपस्थित राहता येईल, अशा गृह विभागाच्या प्रस्तावाला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Chief Minister Uddhav Thackeray) यांनी आज मान्यता दिली.

मात्र, आरोग्य नियमांचे पालन करून, सर्वांच्या आरोग्याची आणि स्वच्छतेची काळजी घेत शिवछत्रपतींचा जन्मोत्सव सोहळ्याचे क्षण साजरे करावेत, असे आवाहनही मुख्यमंत्र्यांनी केले आहे.

Maratha Reservation : ठरलं! मराठा आरक्षणासाठी संभाजीराजे छत्रपती ‘या’ तारखे पासून आमरण उपोषण करणार

येत्या शनिवारी (दि. १९) छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती आहे. त्या अनुषंगाने गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई (Minister of State for Home Affairs Shambhuraj Desai) यांनी शिवज्योत आणि जन्मोत्सव सोहळ्यातील उपस्थितीबाबत विशेष बाब म्हणून अनुमती देण्याचा प्रस्ताव मुख्यमंत्र्यांकडे सादर केला होता.

त्यावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ही मान्यता दिली आहे. तसे निर्देशही गृह विभागासह संबंधित यंत्रणांना देण्यात येत आहेत. शिवजयंती उत्सवासाठी विविध शिव प्रेरणास्थळांवरून शिवज्योती वाहून आणण्यात येतात. त्यासाठी या शिवज्योजी दौडीत दोनशे जणांना सहभागी होता येईल. तसेच शिव जन्मोत्सव सोहळ्यात पाचशे जण उपस्थितीत राहू शकणार आहेत.

Google Dog : शाब्बास! नाशिक पोलिस श्वान पथकातील ‘गुगल’ने शाेधली अपहृत अकरा वर्षांची मुलगी

दरम्यान, गेल्या दोन वर्षात कोरोनाच्या संकटामुळे (Covid-19) कोणताही सण, उत्सव हा नेहमीसारखा मोकळेपणाने साजरा करता आलेला नाही. कोरोनामुळे दोन वर्षातल्या प्रत्येक सण उत्सव, जयंतीवर काही ना काही निर्बंध राहिले आहेत. मागील दोन वर्ष मोठ्या कार्यक्रमांवर बंदी घालण्यात आली होती.

मात्र यंदा कोरोनाचा दाह कमी होत असल्याने राज्य सरकारने शिवजयंती उत्सव सार्वजनिक पद्धतीने साजरा करण्यासाठी मोठा निर्णय जाहीर केला आहे. राज्य सरकारने ही नवी नियमावली जारी केली आहे. त्यामुळे शिवभक्तांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.

See also  Maharashtra Rain Alert : राज्यात पावसाचा जोर वाढला! पुढील 48 तास महत्वाचे 'या' 9 जिल्ह्यात 'ऑरेंज अलर्ट'

आपण ह्या बातम्या वाचल्यात का?


Share on Social Sites