Maratha Reservation : ठरलं! मराठा आरक्षणासाठी संभाजीराजे छत्रपती ‘या’ तारखे पासून आमरण उपोषण करणार

मराठा आरक्षणासाठी संभाजीराजे छत्रपती 'या' तारखे पासून आमरण उपोषण करणार l Sambhaji Raje Chhatrapati announcement to fast till death for Maratha reservation
मराठा आरक्षणासाठी संभाजीराजे छत्रपती 'या' तारखे पासून आमरण उपोषण करणार l Sambhaji Raje Chhatrapati announcement to fast till death for Maratha reservation
Share on Social Sites

मुंबई l Mumbai :

मराठा आरक्षणासाठी खासदार संभाजीराजे छत्रपती (MP Sambhaji Raje Chhatrapati) पुन्हा एकदा आक्रमक भूमिका घेतली आहे. मराठा समाजाच्या विविध मागण्यांसाठी (दि. २६) फेब्रुवारी रोजी आमरण उपोषण करण्याची मोठी घोषणा संभाजीराजे यांनी केली आहे.

मराठा समाजाला शैक्षणिक व नोकरीत आरक्षण (Maratha Reservation) द्यावे म्हणून संभाजीराजे यांनी राज्यात आंदोलन उभारले आहे; परंतु कोरोना संसर्गामुळे आंदोलनाची पुढील दिशा ठरविली नव्हती, तरीही मराठा आरक्षण व समाजाच्या इतर अनुषंगिक मागण्याबाबत त्यांनी समाजातील सर्व क्षेत्रातील मुख्य घटकांशी विचारविनिमय केला. त्यानंतर मराठा आरक्षणाबाबत सोमवारी मुंबईत आपली पुढील दिशा जाहीर केली आहे.

Shivjayanti 2022 : शिवजयंती बाबत राज्य सरकारची नियमावली जाहीर; असे असतील नियम

संभाजीराजे म्हणाले, “२००७ पासून मी संपूर्ण महाराष्ट्र पिंजून काढला आहे. मराठा समाज देखील वंचित घटक आहे. त्यासाठीच आरक्षणाची भूमिका घेतली. मी मराठा आहे म्हणून मराठा आरक्षणासाठी लढतो आहे, असे नाही. दि. ०५ मे २०२१ ला आरक्षण रद्द झाले. मागील काही दिवसांत अनेकवेळा आंदोलने केली.

प्रेयसीने पेटवून दिलेल्या ‘त्या’ युवकाचा अखेर मृत्यू; Valentine Day च्या दिवशी घडलेल्या घटनेने हळहळ

मात्र, अजूनही कोणतीच मागणी पूर्ण नाही. मी आत्तापर्यंत आक्रमक होतो. पण आता मी उद्विग्न झालो आहे. मला समन्वयक यांनी सांगितल की टोकाची भूमिका घेऊ नका. परंतू सरकार काहीच हालचाल करत नाही. त्यामुळे माझी भूमिका आहे की, आता दि. २६ फेब्रुवारीला मी स्वतः आमरण उपोषणाला मुंबईतील आझाद मैदानात (Azad Maidan, Mumbai) बसणार आहे.”

मी सर्वांना घेऊन जाणारा माणूस आहे. मी शाहू महाराजांचा वारस आहे. मला सगळ्यांना एवढचं सांगायचे आहे की, आम्हाला टिकणारे आरक्षण द्या. मी सगळ्या पक्षाच्या नेत्यांना हात जोडून विनंती केली की आरक्षण द्या. आरक्षण कशामुळे गेले हे देखील सांगितले परंतू काहीच हालचाल झाली नाही.

मी आरक्षण रद्द झाल्यानंतर रिव्ह्यू पिटिशन (Review Petition) दखल करा, असे सांगितल. मात्र, खूप दिवसांनंतर याचिका दाखल करण्यात आली. सध्या त्याची काय परिस्थिती आहे, हे काहीच माहिती नाही. त्यामुळे माझे स्पष्ट मत आहे की समिती स्थापन करा, असे संभाजीराजे म्हणाले.

TET Exam Scam update : धुळ्यातील ‘त्या’ १००३ तर पुण्यातील ३२३ उत्तीर्ण उमेदवारांवर कारवाईची टांगती तलवार; पोलिसांच्या तपासातून धक्कादायक माहिती समोर

याचबरोबर, सर्व नेत्यांच्या दारी गेलो. मूक आंदोलन कोल्हापुरात (Kolhapur) केले. परंतू, या आंदोलनाने काहीच झाले नाही. मोजून पाच ते सहा मागण्या आहेत परंतू अजूनही मान्य होत नाहीत. सर्वोच्च न्यायालय म्हणत आहे की ५० टक्क्यांच्यावर आरक्षण द्यायचे असेल तर अपवादात्मक परिस्थीत असायला हवी.

अनेकजण म्हणातात की ओबीसीमधून आरक्षण द्यायला पाहिजे, परंतु माझे म्हणणे आहे की टिकणारं आरक्षण द्या, असे संभाजीराजे यांनी सांगितले.

दरम्यान, मराठा आरक्षण व समाजाच्या इतर अनुषंगिक मागण्याबाबत संभाजीराजे यांनी समाजातील सर्व क्षेत्रातील मुख्य घटकांशी विचारविनिमय केला आहे. या चर्चेतून त्यांनी आज आंदोलनासंदर्भात निर्णय घेतला आहे.

See also  ऐतिहासिक निर्णय! अविवाहित महिलेला 24 आठवड्यांच्या गर्भपातास परवानगी

आपण ह्या बातम्या वाचल्यात का?

See also  दुर्दैवी!; नाशिक-नंदुरबार एसटी बसने विद्यार्थिनीला चिरडले

Share on Social Sites