तारीख पे तारीख! मान्सूनच्या महाराष्ट्रातील आगमनासाठी आता ‘हा’ नवा मुहूर्त

तारीख पे तारीख! मान्सूनच्या महाराष्ट्रातील आगमनासाठी आता 'हा' नवा मुहूर्त l Monsoon 2022 arrival likely delayed rain lingered on the border of Goa
तारीख पे तारीख! मान्सूनच्या महाराष्ट्रातील आगमनासाठी आता 'हा' नवा मुहूर्त l Monsoon 2022 arrival likely delayed rain lingered on the border of Goa
Share on Social Sites

मुंबई l Mumbai :

मान्सून (Monsoon 2022) यंदा लवकर येणार म्हणून वेळेआधीच मान्सूनकडे डोळे लावून बसलेल्या आणि तसा अंदाज वर्तवणारे सर्वच जण धाडकन जमिनीवर आले आहेत. यंदा मान्सून महाराष्ट्रात काहीसा लवकरच दाखल होणार असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला होता. (Monsoon delay in Maharashtra)

https://twitter.com/maha_tourism/status/1533723200982355968

हा अंदाज कासीचा चुकला असून आता दि. 12 ते दि. 13 ऑक्टोबर रोजी मान्सून महाराष्ट्रात दाखल होण्याची शक्यात आहे, असा नवा मुहूर्त वर्तविण्यात आला आहे. त्यामुळे मान्सून लांबणीवर (Monsoon 2022 Arrival Likely Delayed in Maharashtra) पडला की काय? अशी चिंता व्यक्त केली जात आहे. दरम्यान, मान्सून गोव्याच्या (Goa) सीमेवरच रेंगाळल्याचेही बोलले जात आहे. खास करुन कारवार, चिकमंगळूर या कर्नाटक-गोवा (Karnataka-Goa) सीमाभागात मान्सून जरा अधिकच रेंगाळताना दिसतो आहे. (Monsoon 2022 arrival likely delayed rain lingered on the border of Goa it is now expected to arrive in Maharashtra on June 12, 13)

‘गेम’चा नाद लई बेक्कार! बापाच्या मृत्यु पश्चात माय माऊलीने 36 लाख जमवले पण मुलाने झटक्यात उडवले

मान्सूनच्या पार्श्वभूमीवर राज्यात सध्या उन्हाच्या झळांनी काहीली वाढवली आहे. प्रामुख्याने पश्चिम महाराष्ट्र (Western Maharashtra), कोकण (Konkan), उत्तर महाराष्ट्र (North Maharashtra) या भागांमध्ये उकाडा मोठ्या प्रमाणावर वाढला आहे. तर विदर्भात (Vidarbha) उष्णतेचा तडाखा कायम आहे. या तापलेल्या वातावरणात दिलासा देण्यासाठी मान्सूनपूर्व सरींचा शिडकाव येत्या एक-दोन दिवसांमध्ये होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

https://twitter.com/pkusrain/status/1533718411028877313

See also  Maharashtra Cabinet Expansion : अखेर 39व्या दिवशी 'पाळणा हलला'... शिंदेशाहीत 18 नवीन शिलेदार दाखल; महिला नेत्यांना वगळल्याने आणि राठोड यांना स्थान दिल्याने वाद

गेल्या अनेक वर्षाच्या तुलनेत यंदा उन्हाचे चटके काहीसे अधिकच जाणवले आहेत. त्यामुळे मनुष्य, प्राणी-पक्षी आणि धरतीही जणू ‘पड रं पाण्या… पड रं पाण्या… कर पाणी पाणी..’ हे गीतच गात होते. हवामान विभागाने (Meteorological Department) वर्तवलेल्या अंदाजामुळे नाही म्हणायला काहीसा दिलासा मिळाला. यंदा मान्सूनचे आगमन लवकर होणार अशी शक्यता हवामान विभागाने वर्तवली.

भीषण दुर्घटना! भाविकांची बस दरीत कोसळली; 26 जण जागीच ठार, 3 जखमी

ही शक्याता ऐकूनही बळीराजा (Baliraja) आणि अनेकांना आनंद झाला. सर्वांनी मान्सूनसाठी ढगांकडे डोळे लावले खरे. पण मान्सूनने हुलकावणी दिली ती दिलीच. खरे तर हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजामुळे मान्सून दि. 7 जून म्हणजे आजच दाखल होणे अपेक्षीत होते. मात्र तसे कोणतेच चिन्ह सध्या तरी दिसत नाही. परिणामी आता नव्या शक्यतेनुसार दि. 12 ते 13 जूनपर्यंत मान्सून महाराष्ट्रात (Maharashtra) दाखल होईल असे सध्यातरी अपेक्षीत आहे.

…म्हणून ‘त्याने’ रचला उद्योजक आहेर यांचा हत्येचा कट; नाशिक पोलीस आयुक्तांनी केला खुनाचा उलगडा

See also  Nashik Crime News : नाशिकमध्ये अवैध शस्त्रसाठा जप्त; पिस्तुल, काडतुसे, एअरगन, चॉपर, अग्निशस्त्रासह तिघांना बेड्या

Share on Social Sites