नवी दिल्ली l New Delhi :
तेलंगणाची (Telangana) राजधानी असलेल्या हैदराबादमध्ये (Hyderabad) एक मोठी दुर्घटना घडली आहे. भंगाराच्या गोदामाला भीषण आग लागली असून या आगीत होरपळून 11 मजुरांचा मृत्यू झाला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, भाईगुडा (Bhaiguda) परिसरातील एका भंगाराच्या गोदामात अचानक आग लागली. आगीत जळालेले सर्व मजूर हे बिहारचे (Bihar) रहिवासी असल्याची माहिती समोर येत आहे. घटनेची माहिती मिळताच अधिकारी आणि अग्निशमन दलाच्या अनेक गाड्या तातडीने घटनास्थळी दाखल झाल्या.
काय सांगताय! होय, तुम्ही कोणाशी आणि किती वेळ बोलता Google या Apps द्वारे चोरी करतोय डेटा
अग्निशमन दलाच्या जवानांच्या शर्थीच्या प्रयत्नांमुळे आगीवर नियंत्रण मिळवण्यात आता यश आले आहे. हैदराबादच्या सेंट्रल झोनचे अधिकारी आणि अग्निशमन दलाच्या अनेक गाड्या तातडीने घटनास्थळी दाखल झाल्या. डीसीपी यांनी 11 मृतदेह बाहेर काढण्यात आले असून ते शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवण्यात आल्याचे म्हटले आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, भंगार गोदामाच्या पहिल्या मजल्यावर 12 मजूर झोपले होते. त्यावेळी तळमजल्यावर अचानक आग लागली. मजुरांना बाहेर पडण्यासाठी रस्ता हा तळमजल्यावरूनच होता. मात्र शटर बंद असल्याने ते पटकन बाहेर पडू शकले नाही.
Telangana | 11 people died after a fire broke out in a scrap shop in Bhoiguda, Hyderabad
Out of 12 people, one person survived. DRF reached the spot to douse the fire. A shock circuit could be the reason for the fire. We are investigating the matter: Mohan Rao, Gandhi Nagar SHO pic.twitter.com/PMTIDa5ilg
— ANI (@ANI) March 23, 2022
भीषण आगीत 11 मजूर जळाले (Eleven workers were burnt in Hyderabad Fire)
गोदामातील एक मजूर कसाबसा आपला जीव वाचवण्यात यशस्वी ठरला आहे. तो जखमी झाला असून त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. आगीतून आतापर्यंत 11 जणांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले आहे. फायर कंट्रोल रुमला रात्री तीन वाजता याबाबत माहिती मिळाली. त्यानंतर अग्नीशमन दलाच्या नऊ गाड्या या घटनास्थळी दाखल झाल्या. जवानांनी आग विझवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू केले.
तब्बल तीन तासांनी आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश
तब्बल तीन तासांनी त्यांना आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले आहे. गोदामामध्ये फायबरच्या केबलला आग लागली. ज्यामुळे आगीचे लोट आणि धुराचे साम्राज्य निर्माण झाले. थोड्यावेळाने ती आग आणखी वाढली. तसेच भंगाराच्या गोदामात बॉटल, कागद, प्लास्टिक असे इतरही सामान होते. मृतदेहांची ओळख पटवण्याचे काम सध्या सुरू आहे.
आपण ह्या बातम्या वाचल्यात का?
आर्यन खान सुटला! NCB म्हणतेय आर्यनकडे 'ड्रग्ज'च नव्हते
'आज पहिल्यांदा माझा चेहरा पडलेला कारण..' सत्तांतरानंतर उद्धव ठाकरेंनी पहिल्यांदा...
राज्याचा दहावीचा निकाल 96.94 टक्के; यंदाही मुलींनीच मारली बाजी, कोकण विभाग अव्वल...
शिंदें ऐवजी माझ्यासोबत चर्चा करा.. उद्धव यांचा फडणवीसांना फोन; मोदी-शाह नॉट रिचे...