ठरलं! दहावी, बारावी परीक्षा Offlineच

दहावी आणि बारावीच्या परीक्षा ऑफलाइन आणि नियोजित वेळेत होणार आहे l 10th and 12th standard examinations will be held offline and on time
दहावी आणि बारावीच्या परीक्षा ऑफलाइन आणि नियोजित वेळेत होणार आहे l 10th and 12th standard examinations will be held offline and on time
Share on Social Sites

मुंबई l Mumbai :

महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ (Maharashtra State Board of Secondary and Higher Secondary Education) यांच्यावतीने दहावी (SSC Exam) आणि बारावीच्या परीक्षा (HSC Exam) ऑफलाईन पद्धतीने घेण्यात येणार आहे. बोर्डाचे अध्यक्ष शरद गोसावी (Chairman of the Board, Sharad Gosavi) यांनी ही माहिती दिली आहे. प्रात्याक्षिक परीक्षा दोन कालावधीत घेण्यात येणार असल्याची माहिती शरद गोसावी यांनी दिली. दहावी आणि बारावीच्या परीक्षा ऑफलाईन पद्धतीनेच होणार हे आता निश्चित झाले आहे.

विद्यार्थ्यांना त्यांच्या शाळेतचे परीक्षा देता येणार आहे. मुख्याध्यापक (Headmaster), विषयतज्ञ यांच्याशी चर्चा करून निश्चित करण्यात आले आहे. दहावी आणि बारावीच्या परीक्षा ऑफलाईन (HSC SSC Offline Exam) पद्धतीनेच होणार असल्याचे आता स्पष्ट झाले आहे. बारावीच्या लेखी परीक्षा दि. ०४ मार्च ते दि. ३० मार्च या कालावधीत होणार आहेत. तर दहावीच्या परीक्षा दि. १५ मार्च ते दि. ०४ एप्रिल या काळात होतील.

Nashik Crime : ‘ताे’ हाडांचा सांगाडा डाॅ. सुवर्णा वाजे यांचाच; खून झाल्याचे निष्पन्न

बारावीच्या लेखी आणि प्रात्याक्षिक परीक्षा (Written and practical examination of Class 12th)

महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ यांच्याकडून बारावीच्या परीक्षा दि. ०४ मार्च ते दि. ३० मार्च या कालावधीत घेण्यात येतील. प्रात्याक्षिक परीक्षा, श्रेणी परीक्षा दि. १४ फेब्रुवारी ते दि. ०३ मार्च मध्ये होतील. कोरोना आणि इतर कारणामुळे अडचण आल्यास दि. ३१ मार्च ते दि. १८ एप्रिल या कालावधीत प्रात्यक्षिक परीक्षा होतील. दुसऱ्या टप्प्यातील परीक्षेसाठी कोरोनोमुळे मंडळ परीक्षा शुल्क आकारणार नाही.

दहावीच्या लेखी आणि प्रात्याक्षिक परीक्षा (Written and practical examination of class 10th)

दहावीची परीक्षा दि. १५ मार्च ते दि. ०४ एप्रिल पर्यंत घेण्यात येणार आहे. प्रात्याक्षिक, तोडी परीक्षा दि. २५ फेब्रुवारी ते दि. ०३ मार्च या कालावधीत परीक्षा होईल. काही कारणामुळे प्रात्यक्षिक परीक्षा देता आली नाही तर दि. ०५ एप्रिल ते दि. २२ एप्रिल पर्यंत होतील. मंडळाच्या परीक्षा ठरलेल्या काळातचे होतील.

Trekking Accident : दगडाने केला घात; १२० फूट खोल दरीत कोसळून दोघा ट्रेकर्सचा मृत्यू, १२ जण सुखरूप

दहावी बारावीसाठी किती विद्यार्थ्यांनी नोंदणी केली? (How many students registered for 10th and 12th?)

मंडळाकडे दहावीसाठी १६ लाख २५ हजार ३११ अर्ज आले आहे. तर बारावी १४ लाख ७२ हजार ५६२ अर्ज आल्याची माहिती शरद गोसावी यांनी दिली. आपल्या मंडळाच्या परीक्षेचे स्वरुप हे वस्तूनिष्ठ (Objective), लघूत्तरी (Short Answer) आणि दिर्घोत्तरी (Long Answer) असे असते . बारावीसाठी आपल्याकडे १५८ विषय असतात. विज्ञान शाखेसाठी ४ माध्यमातून परीक्षा होते. कला (Arts) आणि वाणिज्य (Commerce) माध्यमातून ६ माध्यमातून परीक्षा होते. १५८ विषयांसाठी ३५६ प्रश्न पत्रिका असतात. दहावीसाठी ७ विषय आणि ८ माध्यम असतात त्याच्या १५८ प्रश्नपत्रिका असतात. राज्यात पावणे दोन लाख कर्मचारी परीक्षा देतात.

यूपीमध्ये असदुद्दीन ओवेसींच्या गाडीवर तीन ते चार राउंड फायरिंग

स्वत:च्या शाळेत परीक्षा देण्याची संधी (Opportunity to take exams in your own school)

कोरोनामुळे या वर्षी विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी शाळा तिथे परीक्षा उपकेंद्र घेण्याचे निश्चीत करण्यात आले आहे. विद्यार्थी ज्या शाळेत शिकतो तिथेच परीक्षा होणार आहे. विद्यार्थ्यांना तणावाशिवाय परीक्षेला सामोरे जाता येते. ज्या शाळेत १५ पेक्षा कमी विद्यार्थी असतात तिथे जवळच्या शाळेत विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्र देण्यात येईल. ४० ते ६० गुणांच्या परीक्षेसाठी १५ मिनिटे जादा वेळ, ७० ते १०० गुणांच्या परीक्षांसाठी अर्धा तास अधिक देतोय. परीक्षेचा पेपर १०.३० वाजता सुरु होईल. विद्यार्थ्यांच्या हातात १०.२० आणि दुपारच्या सत्रात २.५० वाजता प्रश्नपत्रिका देण्यात येईल. नियमित परीक्षा पद्धतीवेळी असतात त्यापेक्षा चार पट केंद्र निश्चित करण्यात आली आहेत, असे शरद गोसावी म्हणाले.

दुःखद : ज्येष्ठ अभिनेते रमेश देव यांचे निधन

लेखी परीक्षा 75 टक्के अभ्यासक्रमावर (Written exam on 75 percent of the syllabus)

लेखी परीक्षा ७५ टक्के अभ्यासक्रमावर आधारीत असेल. २५ टक्के अभ्यासक्रम कमी करण्यात आला आहे. परीक्षा १५ दिवस उशिराने सुरु करण्यात येणार आहेत. दहावीची परीक्षा १५ मार्चपासून सुरु होत आहे. विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी आणि शिक्षकांना अध्यापनासाठी वेळ मिळेल. प्रात्यक्षिक परीक्षा ही किमान ४० टक्के अभ्यासक्रमावर आधारित होणार आहेत. अंतर्गत आणि बहिस्थ परीक्षक संबंधित शाळेतीलचे असणार आहे. लेखी परीक्षा सुरु असताना विद्यार्थ्याला वैद्यकीय त्रास झाल्यास स्वतंत्र कक्षात त्याची व्यवस्था करण्यात येईल. शासकीय आरोग्य केंद्राच्या डॉक्टरांना बोलवून उपचार केले जातील आणि तिथे त्याला परीक्षा देता येईल. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर झिक झॅक पद्धतीने (zigzag pattern) एका वर्गात २५ विद्यार्थी बसतील.

See also  ओबीसी आरक्षणाचं विधेयक विधानसभेत मंजूर; प्रभाग रचना आणि निवडणुकीच्या तारखा ठरवण्याचे अधिकार आता राज्य सरकारकडे

आपण ह्या बातम्या वाचल्यात का?


Share on Social Sites