मुंबई l Mumbai :
कारगिल विजय दिवस 2022
कारगिल विजय दिवस (Kargil Vijay Diwas 2022) हा प्रत्येक भारतीय नागरिकासाठी एक महत्वाचा दिवस आहे. भारतात दि. 26 जुलै रोजी हा दिवस साजरा केला जातो. भारत (India) आणि पाकिस्तानमध्ये (Pakistan) 1999 साली युद्ध झालं होतं. हे युद्ध लडाखच्या कारगिलमध्ये (Kargil, Ladakh) एकूण 60 दिवस चाललं. दि. 26 जुलै रोजी या युद्धाचा शेवट झाला.
युद्धावेळी भारतीय लष्करानं पाकिस्तानी (Pakistan) घुसखोरांना देशाबाहेर हाकलवून लावलं. ऑपरेशन विजयचा भाग म्हणून टायगर हिलसह (Tiger Hill) लष्कराच्या इतर सर्व चौक्यांवर कब्जा मिळवला. या युद्धात भारताचा विजय झाला. कारगिल विजय दिवस हा युद्धात शहीद झालेल्या भारतीय जवानांच्या (Indian Army) सन्मानासाठी, त्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी साजरा केला जातो. देशभरात विविध ठिकाणी मोठ्या कार्यक्रमांचं आयोजन केलं जातं.
“Let us honour all of our courageous warriors who have safeguarded us at all hours of the day and night. Kargil Vijay Diwas Wishes 2022 to everyone.”#OpVijayDiwas#KargilVijayDiwas#KVD2022#23YrsOfKargilVijay#HowsTheJosh #Victory1999 pic.twitter.com/y3IeEDXuQX
— Jannat-E-Lolab (@JannatLolab) July 25, 2022
शांतता करारानंतरही पाकिस्तानची घुसखोरी सुरूच
1971 च्या भारत पाकिस्तान युद्धानंतरही दोन्ही देशांच्या सैन्यात अनेकदा संघर्ष पाहायला मिळाला. अणु चाचण्यांमुळे दोन्ही देशातील तणाव अजून वाढला. अशावेळी वातावरण शांत करण्यासाठी दोन्ही देशांनी फेब्रुवारी 1999 मध्या लाहोर (Lahore) इथं घोषणापत्रावर स्वाक्षरी केली. या घोषणापत्रात काश्मिरच्या (Kashmir) मुद्द्यावर दोन्ही देश चर्चेच्या माध्यमातून शांततेनं मार्ग काढतील असा करार करण्यात आला होता. मात्र, पाकिस्तानने पुन्हा कुरघोडी करायला सुरुवात केली. पाकिस्तानचे तत्कालीन लष्करप्रमुख जनरल परवेझ मुशर्रफ (Former Army chief of Pakistan General Pervez Musharraf) यांनी तत्कालीन पंतप्रधान नवाझ शरीफ (Former Prime Minister Nawaz Sharif) यांना न कळवता युद्धाची आखणी केली होती असं सांगितलं जातं. दरम्यान, पाकिस्तानच्या सैन्याने आणि अर्ध-सैनिक दलातील जवानांनी भारतात घुसखोरी करायला सुरुवात केली. त्याला त्यांनी ‘ऑपरेशन बद्र’ (Operation Badr) असं नाव दिलं होतं. त्यांचा मुख्य उद्देश हा काश्मीर आणि लडाखमधील मुख्य अडसर दूर करणे आणि भारतीय सैन्याला सियाचिन ग्लेशियरपासून (Siachen Glacier) दूर लोटनं हा होता.
#WATCH | The nation marks #KargilVijayDiwas today, tributes being paid to soldiers who lost their lives in the 1999 Kargil War. Visuals from Kargil War Memorial in Drass. pic.twitter.com/EbaNlx9tse
— ANI (@ANI) July 26, 2022
युद्धात 550 जवान शहीद, 1 हजार 400 च्या आसपास जवान जखमी
सुरुवातीला ही एक घुसखोरी आहे आणि काही दिवसांत त्यांना बाहेर काढलं जाईल असं वाटत होतं. मात्र नियंत्रण रेषेवरील स्थिती आणि घुरखोरांच्या नियोजित रणनितीचा मागोवा घेतल्यानंतर हा मोठ्या हल्ल्याचा कट असल्याचा अंदाज भारतीय लष्कराला (Indian Army) आला. त्यानंतर भारत सरकार आणि लष्कराने ऑपरेशन विजयची (Operation Vijay) आखणी केली. 2 लाख सैनिकांना सीमारेषेवर पाठवलं. हे युद्ध 60 दिवस चाललं आणि दि2. 6 जुलै 1999 रोजी भारताने या युद्धात विजय मिळवला. या विजयात हवाई दलाचाही मोठा वाटा आहे. कारगिलच्या युद्धात साडे पाचशे जवानांना वीरमरण आलं तर 1 हजार 400 च्या आसपास जवान जखमी झाले होते.
26 July celebrated as Kargil Vijay Diwas, will be remembered for the patriotism, dedication, determination & exceptional valour of our Kargil Ke Veer.#KargilVijayDiwas
#कारगिल_विजय_दिवस pic.twitter.com/54od1Phbb2
— Tanmay 🇮🇳 (@BeingTanu) July 26, 2022
पाकिस्तानकडून हात झटकण्याचाही प्रयत्न
कारगिल युद्धात पाकिस्तानी लष्कराचा हात होता ही गोष्ट पाकिस्तान नेहमी नाकारत आला आहे. पण या युद्धानंतर समोर आलेल्या अनेक पुराव्यातून पाकिस्तानी लष्कराने घुसखोरांना मोठी मदत केल्याचं स्पष्ट झालं. पाकिस्तानचे तेव्हाचे पंतप्रधान नवाझ शरीफ युद्धात मदत मागण्यासाठी अमेरिकेलाही (America) गेले होते. मात्र, अमेरिकेचे तत्कालीन राष्ट्राध्यक्ष बिल क्लिंटन (Former US President Bill Clinton) यांनी पाकिस्तानला मदत करण्यास स्पष्ट नकार दिला होता.
Kargil Vijay Diwas is a reminiscence of undaunted bravery & courage of the #Bravehearts who inscribed a golden chapter in history, with their blood & sacrifice.
They gave a befitting reply to enemy's misadventure and a resounding victory to #India.#IndianArmy pic.twitter.com/HwVFrYHwt1— ADG PI – INDIAN ARMY (@adgpi) July 26, 2022